12 वी पास महिलांना आता मिळणार सरकारी नोकरी ची संधी | Anganwadi Bharti 2025

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती 2025

 Anganwadi Bharti 2025 : तर महिलांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे कारण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती 2025 अंतर्गत महिलांना सरकारी नोकरीची संधी प्राप्त करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रातील महिला व बालविकास विभागाने 2025 साली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्याच्यातून, महाराष्ट्र राज्यभरात एकूण 18,882 पदे भरण्यात येणार आहेत, ज्यामध्ये 5,639 अंगणवाडी सेविका आणि 13,243 अंगणवाडी मदतनीस पदांचा समावेश आहे.

 आता हा फॉर्म कुणाला भरता येणार आहे यासाठी पात्रता काय असणार आहे व काय कागदपत्र लागणार आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी पोस्ट अगदी महत्त्वाची असल्यामुळे काळजीपूर्वक वाचा.

  IMPORTANT  

Ladki Bahin Yojana 2025|आता या गोष्टीची पडताळणी होणार आणि त्यानंतर मिळणार योजनेचा लाभ. 

 

शैक्षणिक पात्रता:

 तर या साठी आपल्याला जो शिक्षण लागणार आहे ते खालील प्रमाणे आहे.

  1. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस: किमान इयत्ता 12 वी (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बारावीच्या शिक्षणात मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक व तसेच मानपत्र सादर करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

 आता या साठी जी वयोमर्यादा नसणार आहे ते खाली पाहू.

  1. उमेदवाराचे वय किमान 18 किंवा पेक्षा जास्त
  2. कमाल वय 35 वर्ष
  3. ज्या महिला विधवा आहेत त्यासाठी 40 वर्ष

 आता महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे कागदपत्रे सरकार कुठल्याही नोकरी संबंधित कागदपत्र हे खूप महत्त्वाचे असते असे सांगितले जाते, कागदपत्र हे अतिशय महत्त्वाचे असतात त्यामुळे खाली दिलेली कागदपत्राची यादी आहे त्यामधले सर्व कागदपत्र तुमच्यापाशी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

तू कुठले कागदपत्रे लागतात ते खालील अगदी काळजीपूर्वक वाचा.

आवश्यक कागदपत्रे:

  1. शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि गुणपत्रके (12 वी, पदवी, पदव्युत्तर, D.Ed., B.Ed. इत्यादी, लागू असल्यास).
  2. विधवा किंवा अनाथ असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र (लागू असल्यास).
  3. MS-CIT उत्तीर्ण प्रमाणपत्र (लागू असल्यास).
  4. अंगणवाडी सेविका/मदतनीस म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र (लागू असल्यास).
  5. आधार कार्ड.

 याव्यतिरिक्त आणखीन माहितीसाठी ऑफिशियल वेबसाईट वरती भेट द्या व त्याची लिंक खाली देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया कशी असणार आहे :

 आता या मध्ये निवड कशी होणार हे खूप जणांचा प्रश्न पडला असेल तर मित्रांनो यामध्ये जे निवड होणार आहेत ते खालील प्रमाणे सांगण्यात आले आहे.

उमेदवारांची निवड बारावीतील गुण, उच्च शिक्षण, विधवा/अनाथ स्थिती, जात प्रवर्ग आणि अनुभवाच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल. गुणवत्तेनुसार तयार केलेल्या यादीनुसार पंचायत समिती स्तरावर नियुक्त्या दिल्या जातील.

महत्त्वाची माहिती

 बरेच उमेदवार फॉर्म भरत असताना काही चुका करतात ज्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट केला जातो किंवा त्यांचे सिलेक्शन होत नाही तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण अगदी काळजीपूर्वक त्याचं पालन केला पाहिजे अन्यथा तुमचे सुद्धा फॉर्म अपात्र केले जाऊ शकते तर खालील दिलेल्या काही माहिती आहेत ते वाचून बघा.

एका उमेदवारांनी फक्त एकच फॉर्म भरावा

अर्जामध्ये चुकीची माहिती भरून अर्ज केल्यास तो अर्ज रद्द केला जाईल किंवा अपात्र ठरवला जाईल

ज्या महिला विधवा किंवा अनाथ अशा महिला अर्ज भरणार आहेत त्यांनी सक्षम प्राधिकाराने दिलेला अर्ज जोडणे आवश्यक आहे.

तर अर्जदाराने व उमेदवाराने हे लक्षात घ्यावे आपले अर्ज अपात्र होऊ नये याकरिता या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत व याचे पालन केले पाहिजे.

 आता ज्या व्यक्ती या सर्व गोष्टींमध्ये पात्र ठरत आहेत अशांनी अर्ज करायला हरकत नाही तर मग वाट कसली पाहताय लवकरात लवकर अर्ज करा आणि तयारीला लागा.

आणि अशाच नवीन योजना संबंधित किंवा सरकारी नोकरी संबंधित आपल्या yojanavarta.in या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या