मित्रांनो आपण सर्वजण Sarkari Yojana 2024 अंतर्गत राबविण्यात आलेल्या, Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana या योजनेमध्ये सर्वजण कार्यरत होतो, आणि आपण त्या ठिकाणी काम हे अतिशय प्रामाणिकपणे सुद्धा पूर्ण केले आहोत.
Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana
परंतु Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana GR नुसार आपले प्रशिक्षणाचे कार्यकाळ हे ६ महिनेच होते, शासनाच्या म्हणण्यानुसार सहा महिन्याचे प्रशिक्षणांना पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना त्याच ठिकाणी रोजगार देऊ असे त्यांचे आश्वासन दिले होते.
परंतु सहा महिने पूर्ण झाल्यानंतर शासनाने परत रोजगार देण्यास नकार दिला होता परंतु आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी एकजूट होऊन आंदोलन केल्यामुळे सरकारला प्रशिक्षणात वाढ करून द्यावे लागले त्यांनी ती वाढ फक्त ५ महिन्यापर्यंत केली आहे.
एक प्रशिक्षणार्थी म्हणून आपले मनोगत
मित्रांनो आपण शिक्षण करून सुद्धा बेरोजगार आहे आणि सरकारने जी योजना राबवली होती त्या योजनेतून आपल्याला भविष्यामध्ये रोजगार मिळेल अशी अपेक्षा होती.
या योजनेअंतर्गत जवळजवळ १,३०,००० (एक लाख तीस हजार) पेक्षा जास्त युवकांनी प्रशिक्षणार्थी म्हणून कार्य केले आहेत मग ते सरकारी आस्थापना असेल किंवा खाजगी क्षेत्रांमध्ये काम केले असतील.
प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी आपले दिलेले कार्य हे पूर्ण प्रामाणिकपणे व अतिशय मनापासून पूर्ण केला, कोणत्याच कामांमध्ये कमी पडले नाही.
आणि ते काम करण्यासाठी शासन पगार म्हणून जे प्रशिक्षणार्थी ज्यांच्याकडे
- Degree त्यांना १०,०००
- १२ झाली असेल तर ८,०००
- ८ झाली असेल तर. ६,०००
अश्या प्रकारे पगार दिला जात होता.
इतका कमी पगार असताना सुद्धा प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी पगाराची परवा न करता आपल्या दिलेले काम हे व्यवस्थितरित्या पार पाडले.
या सर्व गोष्टींच्या मागे फक्त एकच हेतू होता की आपण जर काम व्यवस्थित केलं तर आपल्याला नक्कीच शासन हे पुढे आणखीन काम करण्यासाठी कार्यकाळ वाढवून देईल आणि, पगार सुद्धा वाढ करून देईल.
परंतु अलीकडे सरकार या गोष्टीत दखल घेत नसल्यामुळे आज हजारो प्रशिक्षणार्थी है मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत.
गेली 14 ते 15 दिवस होत आले आहे आंदोलन सुरूच आहे, आणि या आंदोलनाचा नक्कीच निकाल लागेल आणि निकाल हा युवा कार्य प्रशिक्षणार्थी चाच असेल अशी अपेक्षा आहे.
प्रशिक्षणार्थी ची मागणी
या आंदोलनातील प्रमुख मागण्यांपैकी काही महत्त्वाच्या मागण्या आहेत ते खालील प्रमाणे.
१. पगारामध्ये वाढ व्हावी
२. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायम रोजगार द्यावा.
यासारख्या आणखीन विविध मागण्या ह्या सरकारपुढे ठेवण्यात आल्या आहेत.
तरी या आंदोलनामध्ये उपस्थित असलेल्या किंवा अप्रत्यक्षपणे उपस्थित असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी तसेच या प्रशिक्षणाचे सर्व मागणी पूर्ण व्हावी यासाठी मार्गदर्शन करणारे सर्वजण यांचा खूप खूप आभार.
प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणारे
- हरिभाऊ राठोड साहेब
- बालाजी पाटील चाकूरकर साहेब
- ह.भ.प. श्री. तुकाराम बाबा महाराज
- श्री. अनुप चव्हाण सर
- सोबतच प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे प्रशिक्षणार्थी
Mukhymantri Yuva karyaprashikshan Yojana Online Registration Link
निष्कर्ष
या आंदोलनामध्ये जी मागणी केली जात आहे नक्कीच आपल्याला न्याय देण्यासाठी विचार आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, हे नक्कीच करतील.
यावरती आपली काय राय आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा
Not- ही पोस्ट एक प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे मनोगत म्हणून लिहिण्यात आली आहे त्यामुळे काही चुकी झाली असेल किंवा कोणाचा जरी उल्लेख झाला नसेल कोणाचेही भावना दुखावल्या असतील तर माफी असावी.
0 टिप्पण्या