एक प्रशिक्षणार्थीची सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती वेळ काढून वाचाच | Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025

Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana

Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2015

 एक Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana या योजना अंतर्गत काम करणारा प्रशिक्षणार्थी किंवा सुशिक्षित बेरोजगार म्हणून आपण ही पोस्ट पूर्ण वाचावे आणि शेअर करावी इतके तर आपण करू शकतोच, असे का तर मित्रांनो उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आज मोठ्या संख्यामध्ये आपण बेरोजगार झालो आहोत.

 आणि रोजगार मिळावा यासाठी आपल्याला आंदोलन करावे लागत आहे, आणि याकडे कुणाचेच लक्ष नाही ही अतिशय दुःखाची बाब आहे.

म्हणजे आपल्याला प्रश्न पडत आहे की 

  1. बेरोजगार मुलाचं काय?
  2. बेरोजगार मुलांच्या भावनांचा खेळ केला का?
  3. रोजगार मागणे गुन्हा आहे का?
  4. सरकार पगार वाढ करू शकत नाही का?
  5. बेरोजगारांनी न्याय कोणाकडे मागावा? 

प्रशिक्षणार्थ्यांची मागणी नेमकी आहे तरी काय? 

 या योजनेत लाभ घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी सरकारांकडे फक्त दोनच मागण्या ह्या केल्या आहेत. 
  1. कायमस्वरूपी रोजगार द्यावा
  2. आणि पगारामध्ये वाढ व्हावी 
या दोन मागण्या केल्या जात आहेत.

 या सारखे विविध प्रश्न जे आहेत आता ते मनामध्ये तयार होत आहेत आणि भविष्याची खूप चिंता वाटत आहे, इतकेच नाही तर खाली जी गोष्ट आपण आता पाहणार आहोत हे अत्यंत महत्त्वाचे असून खरंच आपल्या सोबत न्याय होतो का हे आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोतच.

Aadhar Link To Bank Account|घरबसल्या करा आधार कार्ड बँकेशी लिंक एकदम फ्री! 

Ladki Bahan Yojana Latest Update 2025|तुम्ही अपात्र ठरलात किंवा फॉर्म भरलाच नाहीत तर पहा नवीन माहिती. 

Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला ही गोष्ट लक्षात आलीच पाहिजे. 

Yuva Karya Prashikshan Yojana

 प्रत्येक मुलगा किंवा मुलगी सध्या खूप मेहनत करून आपले शिक्षण पूर्ण करत आहे व त्या शिक्षण केल्याचा काहीतरी भविष्यामध्ये फायदा होईल नोकरी लागेल या हेतूने तो आपले शिक्षण अगदी मन लावून पूर्ण करतो परंतु इतके शिकून सुद्धा तो सुशिक्षित बेरोजगार मध्ये शामिल केला जातो.

एक मुलगा म्हणून यावेळीला या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे तर त्याच्यापेक्षा मोठे दुःख काय असणार, घरची परिस्थिती ठीक नसल्यामुळे कसेबसे शिक्षण पूर्ण करून नोकरीची आस ठेवणारा तरुण आज मोठ्या प्रमाणात बेरोजगार होत आहे, महत्वाचे म्हणजे या गोष्टीकडे कुणाचेच लक्ष नाही जो कोणी येतो तो यांच्या भावनिक खेळण्याचा प्रयत्न करत आहे.

2024 मध्ये Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात आली या योजनेचे उद्दिष्ट होते की महाराष्ट्रातील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना योग्य ते काम मिळून त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात यावा हा हेतू होता.

Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2015 GR

व या Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana GR नुसार 6 महिने हे प्रशिक्षण म्हणून दिले जाणार होते, 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्या त्यांना त्याच ठिकाणी कायम रोजगार दिला जाईल असे सुद्धा सांगण्यात आले होते, सरकारच्या या योजनेमुळे हजारो युवकांचे भविष्य हे चांगले जाणार याचे अपेक्षा ठेवत सर्व अत्यंत खुश होते व त्यांनी या योजनेत मोठा सहभाग नोंदवला.

नोकरी लागली हा विचार करत प्रशिक्षणार्थी तर खुश होताच परंतु त्याच सोबत त्यांच्या घर परिवारातील सगळे लोक सुद्धा खूप आनंदी होते.

याच योजनेचा फायदा निस्त प्रशिक्षणार्थ्याला झाला नाही तर सरकारला सुद्धा झाले, ते कस तर सरकार पुढे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे विविध योजना राबवतील या हेतूने मोठ्या संख्येत जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ते सरकारांना मतदानामध्ये मत देऊन परत सरकार आणण्यासाठी प्रयत्न केला आणि यामध्ये यशस्वी सुद्धा झाली.

 परंतु 6 महिने झाल्यानंतर सरकारने सरळ सरळ स्पष्ट सांगितले की आता प्रशिक्षणार्थीचा पुढील कार्यकाळ वाढवून दिला जाणार नाही, हा मोठाच धक्का हे प्रशिक्षणार्थ्याला बसला.

 त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांनी आपले न्याय मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावरती आंदोलन करण्याचे ठरवले व 15 ते 20 दिवस झाल्यानंतर सरकारला जाग आली व ते कुठे फक्त पुढे 5 महिने आणखीन वाढवेल असे सांगण्यात आले.

आणि त्यांनी नवीन Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana GR मध्ये असं लिहिलं आहे की 5 महिन्यानंतर कसलाही रोजगार मागूनये.

ज्यावेळेला ही बातमी आपण विविध टीव्ही चॅनल वरती पाहिलं तर अगदी मनाला धक्काच बसला की कशा पद्धतीने एक सुशिक्षित बेरोजगाराला आज त्रास होत आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत जितके पण प्रशिक्षणार्थी हे कार्यरत होते व ते काम करत होते विविध क्षेत्रांमध्ये मग ते सरकारी आस्थापना स्थापना असतील किंवा संस्थेमधील 

आस्थापना असेल त्या ठिकाणचे काम ते अतिशय जबाबदारीने पूर्ण केले.

दिलेले कामांमध्ये कसलाच आळस न करता दिलेले जबाबदारी पूर्ण करत आपले काम केले कारण भविष्यामध्ये सरकार हे या कामाचा आढावा घेऊन योग्य ते प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगार दिली या अशाने आम्ही पूर्ण शिक्षणार्थी हे अगदी मन लावून काम केली.

 परंतु इतके करून सुद्धा आज याचे काहीच फळ आपल्याला मिळताना दिसत नाही व रोजगार मिळवण्यासाठी आपल्याला आंदोलने करावी लागत आहेत हे अत्यंत विचार करण्यासारखी बाब आहे.

इतकेच नाही तर अगदी 10,000/- हजार रुपये साठी आपण इतकं काम केलं जितके काम सरकारी अधिकारी करतात त्याच प्रमाणे आपण केलेला आहे आणि त्यांना 60 - 70 हजार रुपये पेमेंट पेक्षा जास्त पेमेंट असते त्याच ठिकाणी आपण 10,000/- हजारावरती काम करून सुद्धा सरकार आज आपल्याला रोजगार देऊ शकत नाही.

आता ह्या गोष्टीचा विचार जर आपल्यासारख्या प्रशिक्षणार्थीने नाही केला तर कोण करणार.

 सरकार ही युवांच्या प्रति महत्त्वाचे निर्णय घेईल व येणाऱ्या भविष्यामध्ये प्रत्येक युवाला रोजगार देण्याचा निर्णय हे शासन करेल इतका विश्वास आहे, आणि या विश्वासावर सरकार 100% काम करणार अशी आस आहे.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Official Website

 मित्रांनो ही पोस्ट अतिशय महत्त्वाचे असून यात एक प्रशिक्षणार्थ म्हणून आपली काय विचारा हे व्यक्ति करण्यात आले आहेत तर पोस्ट आवडली असेल तर नक्की प्रत्येक प्रशिक्षणापुरतेपर्यंत ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.

  तुमचे काय मत आहे हे नक्की खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अश्याच नवनवीन योजना संबंधित माहितीसाठी व नोकरी माहिती साठी आपल्या या yojanavarta.in ला फॉलो करून ठेवा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या